Friday, July 18, 2014

छत्रपती शिवाजी महाराजांची गुरु भेट


समर्थ रामदासस्वामींची  कीर्ति ऐकल्यावर शिवाजी  महाराजांना त्यांच्या दर्शनाची ओढ़ लागली. त्यांच्या भेटीसाठी ते कोंढवळाच्या घाळीत गेले तेथे भेट होईल, या आशेने संध्याकाळपर्यंता थांबूनही महाराजांना स्वामींची भेट झाली नहीं. नंतर प्रतापगडावर आल्यावर रात्री झोपेतही छ. शिवजी महाराजांच्या  मनात तोच विचार होता. समर्थ रामदासस्वामी जाणूनबुजुन  महाराजांची भेट घेण्यात टाळत होते. असेच काही  दिवस गेले. एके दिवशी समर्थांच्या दर्शनाची ओढ़ .फारच वाढल्यामुळे ते भावनिमातेच्या देवळात गेले. त्या  रात्री  ते तेथेच देवीसमोर झोपले. रात्री  स्वप्नात त्यांना पायात पादुका, अांग़वर भगवे वस्त्र, हातात माळ, काखेत  कुबड़ी आशा तेज:पुंज रुपात समर्थ रामदासस्वामींचे  दर्शन झाले.  शिवजी महाराजांनी त्यांना शाष्टांग नमस्कार केला.  समर्थनी  त्यांच्या डोक्यावर हाथ ठेवून त्यांना आशीर्वाद दिला.  महाराज जागे हौंन पाहतात, तर त्यांच्या हातात प्रसादाचा नारळ होता.  तेव्हापासून ते समर्थ रामदास स्वामींना आपले गुरु मानू लागले.  


                       
पुढे शिवाजी  महाराजांनी पुष्कळ  पराक्रम केल्यावर समर्थ रामदासस्वामींनी स्वतः शिगंवादी येथे प्रत्यक्ष येऊन महाराजांना दर्शन दिले. महाराजांनी त्यांची पाद्यपूजा केली.  समर्थांनी त्यांना प्रसाद म्हणून एक नारळ, मुठभर माती  , लिद  आणि खड़े दिले.  त्या वेळी आपन राज़्यकारभराचा  त्याग करून समर्थांची सेवा करण्यात उरलेले आयुष्य घालवावे, असा विचार महाराजांच्या मनात आला. समर्थांनी  महाराजांच्या मनातील हां विचार ओयाखून ते त्यांना म्हणाले,


" राजा, क्षत्रिय धर्माचे पालन कर. प्राण गेला , तरी धर्म सोडु नको. पप्रजेच्या रक्षणासाठी तुझा जन्मा आहे. ते सोडून येथे सेवा करण्यासाठी राहु नको. माझे केवळ  चिंतन केलेस, तरी मी भेटीस येईन, सुखाने, आनंदाने राज्य  कर". 

नंतर समर्थांनी त्यांना राज्य करण्याच्या  आदर्श पद्धती समजावून सांगितल्या .  समर्थांनी महाराजांना कल्याणासाठी नारळ दिला होता.  आत्यंता संतुष्ट आणि तृप्त मनाने शिवाजी  महाराज राज्य करू लागले. महाराजांनी माती म्हणजे पृथ्वी, खड़े म्हणजे गड जिंकले आणि लिध म्हणजे अश्वदल तेहि समृद्ध झाले. गुरुंच्या कृपाप्रसादने महाराजांना कशाची उणीव भस्ली नाही. 

शिवाजी महाराजांनी परक्या शत्रूंचा बिमोड करून स्वराज्य स्थापनेची जी कामगिरी चालवली होती, त्यामुळे समर्थांना मोठा अभिमान वाटायचा.  ते लोकांना छत्रपतींच्या कार्यात सहाय्य करण्याचा, तसेच शक्ति संपादन करून स्वराज्य आणि धर्मरक्षण यासाठी झगडण्याचा उपदेश करत असत. शिवाजी महाराजांची समर्थांवर फार श्रद्धा होती. अनेक प्रसंगात महाराज समर्थ रामदासस्वामींचा  विचार आणि आशीर्वाद घेत असत.

संकटाच्या वेळी आपण सावधगिरीने कसे वागले पाहिजे, याविषयी समर्थांनी शिवाजी  महाराजांना केलेला उपदेश दासबोध या ग्रंथांमधे आहे. त्यात समर्थ म्हणतात, 'नेहमी सावधगिरीने वागावे शत्रु -मित्रांची नीट पारख ठेवावी। एकांतात पुष्कळ  विचार करून योजना ठरवाव्यात। सतत प्रयत्न करात रहवे. पूर्वी अनेक थोर  लोक झाले, त्यांनी पुष्कळ हालापेश्ता सोसल्या होत्या.  न कंटायात , न त्रासात आंकनाशी मैत्री जोडून कार्या करात राहवे.

तर मित्रांनो छ. शिवाजी महाराजांना समर्थ रामदासस्वामींच्या भेटीची ओढ़ लागली होती. त्यांच्या तळमळीमुळे त्यांना स्वप्नात व् प्रत्यक्ष समर्थांचे दर्शन झाले. तर या विषयची शिकवण म्हणजे, आपण आपले धेया असेच तळमळीने, पूर्णपणे धेयाचि ओढ़ लावून ठेवली, तर आपले स्वप्ना पूर्ण होईल हे निश्चितच.



No comments:

Post a Comment