Showing posts with label ज्ञानेश्वर. Show all posts
Showing posts with label ज्ञानेश्वर. Show all posts

Saturday, August 16, 2014

मराठी भाषा : अवघ्या महाराष्ट्राची मातृभाषा

मराठी भाषा आमची मायबोली - म्हणजेच मातृभाषा. प्रत्येकाला आपल्या मातृभाषेचा कौतुक असते. हा लेख लिहिण्याचे मुळ कारण म्हणजे, मला असा वाटते आहे की काही तरुणां मधे मराठी भाषे बद्दल चा अभिमान किव्वा मराठी भाषे बद्दलचे महत्व दिवसें दिवस कमी होत चालले आहेत. तर या लेखात मी पूर्ण मराठी भाषेचा इतिहास सांगू इच्छितो.

मित्रांनो, भारतात अनेक भाषा बोलली जातात जस हिंदी, इंग्रजी, तेलगु, आसामी आणि इतर काही.  भारताच्या राज्यघटनेतील २२ अधिकृत भारतीय भाषांच्या यादीत मराठीचा समावेश आहे. मराठी भाषा ही महाराष्ट्र राज्यातील एकमेव अधिकृत राजभाषा आहे.  मराठी भाषेचा
उदय संकृतच्या प्रभावाखाली निर्माण झालेल्या प्राकृत भाषेच्या महाराष्ट्री या बोलीभाषेपासून झाला. असे  बहुतांशी मानले जाते. पैठण येथील सातवाहन साम्राज्याने  महाराष्ट्री भाषेचा प्रशासनात वापर सर्वप्रथम केला. देवगिरीच्या यादवांच्या काळात मराठी भाषा व संस्कृतीची भरभराट झाली. ई. स. ११८८ मध्ये मुकुंदराज या कवीने विवेकसिंधु या काव्य ग्रंथाची रचना मराठी भाषेत केली. त्यानंतर ई. स. १२९० मध्ये ज्ञानेशवरी या ग्रंथाची रचना ज्ञनेश्वरांनी केली. यंत्र महानुभाव संप्रदायने मराठी साहित्यात मौलिक भर घातली. संत एकनाथ यांनी या भाषेत भारुडे लिहिली आणि एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आदि ग्रंथाची भर घातली.